मुंबई : नागपुर येथील सभेत माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नागपुरला लागलेला कलंक असा केल्याने भाजप आक्रमक झाली आहे. अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे पोस्टर देखील जाळले आहेत. तर भाजपच्या नेत्यांकडून ठाकरेंवर टिका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…पंकजा मुंडे ‘या’ विधानसभा मतदारसंघातून लढणार, धनंजय मुंडे सत्तेत सहभागी झाल्याने झाला होता पेच
कलंक शब्दात इतकं लागण्यासारखं काय होतं? घराघरात इडी, सीबीआयला घुसवता तेव्हा कलंक लागतो. भ्रष्टाचाराचे आरोप करता आणि त्याच कलंकित नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेता म्हणून कलंक शब्दाची जाणीव करून दिली तर तळपायाची आग मस्तकात का जाते? सरकारचा कारभारदेखील महाराष्ट्राला एक कलंक आहे. असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसचे २५ नेते दिल्लीत दाखल, ‘या’ नेत्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ? रणनीती ठरणार
नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार पवारांच्या उपस्थितीत प्रदान होणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला, तो पक्ष तुमच्यासोबत आला. पवारसाहेब तुमच्यासोबत व्यासपीठावर असणार, आमच्यातले मिंधे असणार, मग लोकांनी बघायचं काय? कोण कुणाला कलंक लावतंय? यातच चक्की पिसिंग पिसिगं वर आरोप लावले होते, त्याचं काय झालं? असा सवाल देखील ठाकरेंनी भाजपवर केलेत.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींना पवारांच्या हस्ते पुरस्कार, मग ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय ? ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी, केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार आणि शिंदे गटाला स्थान, १२ जुलै होण्याची शक्यता
हेही वाचा…राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन, ५० लाखांची केली मागणी
हेही वाचा…“अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला, काका-पुतण्याच्या संघर्षात मोठा ट्वविस्ट”
हेही वाचा…मोठी बातमी…! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात स्थगिती उठवली, कोणाची नावं चर्चेत ?