मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री आणि बंडखोर आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. यासंदर्भात रवी राणा आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तर या प्रकरणावर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. असली मंत्रिपद ओवाळून टाकतो. एक तारखेला ट्रेलर तर पंधरा दिवसात पिक्चर दाखवणार असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता बंडखोर आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य़ केलं आहे.
“कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही”
आमदारांना समज घालण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आहे. मुळाच एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे. कोणीही बिकाऊ नाही, याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
“केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवताहेत”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अशा आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा, अशी मागणी देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच दोघांना शांततेत बसवून चर्चा करावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
Read also
- “जनतेलाही कळेल की कोणी किती पैसे घेतले”; खडसेंचा राणा-बच्चू कडूंच्या वादावर भाष्य
- “अशी मंत्रिपद बच्चू कडू ओवाळून टाकतो, आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरू”; बच्चू कडूंचा इशारा
- “राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरक्षा कपात करून दडपण आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न”
- “अन् ठाकरेंचं नाव काढून त्याठिकाणी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं”; अजित पवार
- “कोणत्याही पदावर नसलेल्या राणांना सुरक्षा अन् माझी सुरक्षा काढली”; विजय वडेट्टीवार