जळगाव : रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जे काही आरोप केले आहेत. ते त्यांना सिद्ध करावे लागणार आहे. तसेच बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळे यामधून आता दुध का दुध और पाणी का पाणी होईल. असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर भाष्य केलं. तसेच त्यांनी बच्चू कडू यांना आपलं समर्थन देखील दिलं.
“केंद्रीय यंत्रणांचा सुळसुळाट करून राज्य तपास यंत्रणांना मोदी सरकार निष्प्रभ बनवताहेत”
विरोधकांचा आवाज दाबणं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सध्या राज्यातील सरकार करीत आहेत. जी काही सरकारी यंत्रणा आहे. ती सरकारच्या तालावर नाचत आहे. याबाबतचा युक्तिवाद पुण्यातील न्यायालयाने माझ्याबाबत दिलं आहे. पुण्यातील न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांबाबत बोलताना त्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहायला हवे. परंतु ते आता कुण्या व्यक्तीशी प्रमाणिक राहत आहेत. असे ताशारे न्यायालयाने असं म्हटलं आहे.
“केंद्रातील लाड पुरवता पुरवता भाजप महाराष्ट्राला भिकेला लावणार”
तसेच एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून प्रशासनाकडून वदवून घेण्याची भूमिका घेत असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे, आणि हे सरकारच्या माध्यामातून होत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
“खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार
दरम्यान, तसेच बच्चू कडू मंत्रिपदासाठी आग्रही आहे. या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, अशा मंत्रिपदासाठी बच्चू कडू चोमड्या नाही. अशी मंत्रिपद ओवाळून टाकतो. तसेच आम्ही मैदानात उतरू तेव्हा आमदारकीचा राजीनामा घेऊनच उतरू. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी 1 नोव्हेंबर पर्यंत रवी राणा यांना खोके घेतल्याचा पुरावा देण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर राज्यात पिक्चर दाखवणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also
- “अशी मंत्रिपद बच्चू कडू ओवाळून टाकतो, आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरू”; बच्चू कडूंचा इशारा
- “राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरक्षा कपात करून दडपण आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न”
- “अन् ठाकरेंचं नाव काढून त्याठिकाणी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं”; अजित पवार
- “कोणत्याही पदावर नसलेल्या राणांना सुरक्षा अन् माझी सुरक्षा काढली”; विजय वडेट्टीवार
- “कारण नसताना जेरीस आणण्याचा डाव असेल तर मी त्याला बळी पडणार नाही”