मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा ढिसाळ कारभार, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरूषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यावतून त्यांचा केलेला अवमान, वाढती बेरोजगारी आणि त्याला कारणीभूत परराज्यात जाणारे प्रकल्प अशा असंख्या गोष्टींचा जाब या अकार्यक्षम राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यामातून महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा पुकारण्यात आला आहे.
“हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले
महाविकास आघाडीचा उद्या सकाळी 11 वाजता रिचर्डसन अॅंड कृडास, नागपाडा मुंबई येथून मोर्चा सुरू होणार आहे. त्याअगोदर महा मोर्चा कशासाठी म्हणत, हा मोर्चा महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, मिंधे सरकारला भानावर आणण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकर, शाहु यांच्या सन्मानासाठी असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
तर उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाचा डिजर देखील रिलीज करण्यात आला असून त्यामध्ये हल्लाबोल हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच या मोर्चाची सध्या मुंबईत जोरदार तयारी सुरू असून अनेक ठिकाणी मोठे बॅनर देखील लावण्यात येत आहे. तर शिवसेनेकडून कार्यकर्त्यांसाठी मोर्चेचे टी-शर्ट देखील छापण्यात आले आहेत. मात्र महामोर्चाला पोलिसांनी अद्यापही परवानगी न दिल्याने आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यातून त्यांचा केलेला अवमान, बेरोजगारी अशा असंख्य गोष्टींचा जाब या राज्य सरकारला विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल’ हा मोर्चा पुकारण्यात आला आहे. pic.twitter.com/vJ6wq6ZKFc
— NCP (@NCPspeaks) December 16, 2022
Read also
- “मनुस्मृति जागी झाली अन् हे पुन्हा एकदा पिसाळले”; अंधारेंच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात
- “त्याचे काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना दिसेल,” मेहबुब शेखांचा चित्रा वाघ यांच्यावर सुचक वक्तव्य
- “वारकऱ्यांनो सावध रहा..! वारकऱ्यांमध्ये घुसलेला भाजपचा तुषार भोसले हा सुपारीबाज”
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली