मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या गटातील नेत्यांमधील राजकीय संघर्ष अजूनही सुरूच आहे. यातच मुंबईतील सिमेंटकाॅंक्रीट रस्त्यांच्या कामात कोरोडो रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. या कामासाठी विशिष्ट कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे कामे देण्यात आली. तसेच महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना कंत्राटे देऊन मुंबई महापालिका लुटत असल्याची टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्यु्त्तर दिलं आहे.
“गिरीश महाजांनाना ते क्रेडीट घेण्याची गरज नाही”; बंडखोर आमदारांचा गिरीश महाजनांना टोला
मुंबई खड्डेमुक्त झाली, चांगले दवाखाने मिळाले, सौंदर्यीकरण होऊन मुंबईकरांचे जीवन बदलले, तर आपले काय होणार, या भीतीने आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झाली आहे. आम्ही काहीही केले तरी आदित्य ठाकरे यांना टिका करायची सवयच झाली आहे. कोणी काही चांगले काम करीत असेल तर त्याची पोटदुखी होण्याचे कारणच नाही. असा टोला दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
“तुम्हीच आमच्या मनातील मुख्य़मंत्री..!” फडणवीसांकडे बोट दाखवून नवनीत राणांचं वक्तव्य
दरम्यान, येत्या गुरूवारी 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मोदी मुंबईतील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. तसेच त्यांची बीकेसीवर जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीच सरकारकडून काही रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत.
Read also
- मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट
- “सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त
- “बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय
- “सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका
- सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक