मुंबई : आगामी महानगरपालिका डोळ्यासमोर भाजपने मुंबईवर विशेष लक्ष्य ठेवलं आहे. यातच गुरूवारी 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असून बीकेसी मैदानावर त्यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी गर्दी जमवण्याचे आदेश भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
“तुम्हीच आमच्या मनातील मुख्य़मंत्री..!” फडणवीसांकडे बोट दाखवून नवनीत राणांचं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 19 जानेवारीच्या सभेच्या नियोजनाबाबत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेतील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. याबैठकीत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर आणि भाजप मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
“पदवीधर निवडणुकीतील तिकीटावरून भाजप-शिंदे गटात धुसफुस, अनेकांची नाराजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी आपला दावोसचा दौरा रद्द केला आहे. तर मुंबई येथील सभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे दिली आहे. या सभेसाठी कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागातून मोठ्या प्रमाणात लोकांना बीकेसीवर घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
या सभेसाठी भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते आणण्याचं टार्गेट दिलं आहे. शिंदे गटाचे मुंबईत फारसं अस्तित्व नाही. त्यामुळे त्यांना ठाणे आणि बाहेरच्या शहरातून गर्दी जमवण्याचं आवाहन असणार आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरूद्ध बंडाळी केल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होणार आहे. त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यामधून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या १९ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या सभेच्या नियोजनाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकार्यासोबत मंत्री @dvkesarkar जी तसेच आमदार @ShelarAshish जी यांनी बैठक घेऊन दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ##MumbaiAwaitsModi pic.twitter.com/YQTTrDQnna
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) January 15, 2023
Read also
- “सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त
- “बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय
- “सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका
- सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
- “गिरीश महाजांनाना ते क्रेडीट घेण्याची गरज नाही”; बंडखोर आमदारांचा गिरीश महाजनांना टोला