मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काॅंग्रेस देखील भाजपने फोडला असा आरोप केला जात आहे. मात्र यामागे लोकसभा निवडणुकीचं गणित जुळवण्यासाठी ह्या गोष्टी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. यातच आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी महायुती झाली आहे. यातच आता जागा वाटपाचा फार्म्युला देखील ठरला असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव
अजित पवारांनी राष्ट्रवादीविरोधात बंड पुकारून शिंदे- भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यातच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी ४५ जागा तरी जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्यामुळेच शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीला देखील बरोबर घेतलं आहे. असं सांगण्यात येत आहे. तर आता लोकसभांच्या निवडणुकांच्या जागा वाटपाचा ही कार्यक्रम ठरला असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा…दिल्लीतून शरद पवारांनी ‘अजित पवार’ गटाला दिला मोठा धक्का, ‘दोन बड्या’ नेत्यांवर मोठी कारवाई
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष लोकसभेच्या १३ आणि विधानसभेच्या ९० जागा लढवणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. लोकसभेच्या एकूण ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा महायुती म्हणून लढणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे. यातच आता राष्ट्रवादीला कुठल्या भागात जास्त जागा मिळणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना का फोडली ? पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेसह गणित सांगितलं
हेही वाचा…निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले शरद पवार यांनी संकेत, अजित पवारांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड
हेही वाचा…मोठी बातमी…! नऊ आमदार आणि दोन खासदार निलंबित शरद पवार यांचा मोठा निर्णय