मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आता राष्ट्रवादीच्या पक्षनाव आणि चिन्हांबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीवर दोन्ही गटाने दावा सांगितला असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रकरणाबाबतच्या निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिली आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक जालीम उपाय सांगितला आहे.
हेही वाचा…ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं. मग अजिदादा गट शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता देईल. त्यामुळे वादच मिटेल. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले संबंध आहेच. शिवाय शरद पवार यांनी २०१४ मध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिलाच होता. त्यामुळे पवारांनी एनडीएमध्ये यायला हरकत नाही. असं रामदास आठवले यांनी सांगितले आहे. ते नागपूरात बोलत होते.
हेही वाचा…भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना महापालिकेचा मोठा दणका, ३० दिवसांची दिली मुदत
दरम्यान, मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादीच्या चिन्हांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. चिन्ह आणि पक्षनाव मिळवण्यासाठी आता दोन्ही गटाकडून प्रयत्न केले जात आहे. याबाबत निवडणुक आयोगात सुनावणी देखील होत आहे. तर दुसऱ्या बाजूला आता कोर्टातही हे प्रकरण दाखल झाले आहे. त्यामुळे निवडणुक चिन्ह आणि पक्षनाव कोणत्या गटाला मिळणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मतदान करा अन् पोहे, जिलेबी फुकट खा, ” कुणी जाहिर केली ही भन्नाट ऑफर ?
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ सहा वाघांचा कार्यकारिणीत समावेश, निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेचा विस्तार
हेही वाचा…“अजित दादांवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अन्यथा..,” अजित पवार गटाचा बोरवणकरांना इशारा
हेही वाचा…एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणमध्ये मनसेला मोठे खिंडार
हेही वाचा…हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या! बावनकुळे यांच आवाहन तर महेश लांडगे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन