मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचच तापलं आहे. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक राजन विचारे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. मला काही झालं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार राहतील असं त्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात हा विषय आता चर्चेचा ठरला आहे.
“राऊत साहेब.. तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे”; मनसेचा खोचक टोला
राजन विचारे यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना पत्र पाठवलं आहे. राजन विचारे यांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, १३ ऑक्टोबर २०२२ रोजी आमच्या शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने आपली भेट घेऊन, महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनाकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना नोटीसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावरे हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला आहे.
गटविकास अधिकारी झाला गावाचा सरपंच..! आघाडी करत उधळला गुलाल
अशा उपरोक्त परिस्थितीतच माझा मतदारसंघ ठाणे, नवी मुंबई,मीरा-भाईंदर इथपर्यंत पसरलेला आहे. या महापालिका मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने मला वारंवार रात्री अपरात्री मतदारसंघात जावून नागरीकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. त्यामुळेच मला २०१९ च्या ठाणे लोकसभा निवडणुकीत ७ लाख ४० हतार ९६९ मते मिळाली. परंतु शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटतो.
“कार्यकर्त्यांनो आपली ऊर्जा पालिकेच्या निवडणुकीसाठी ठेवा”; शेलाराचं कार्यकर्त्यांना आवाहन
आश्चर्य म्हणजे शिंदे गटातील ज्यांना शासकीय किंवा राजकीय उच्च पद नाहीत अशांनाही पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. माझ्या अंगरक्षकांच्या संख्येत कपात केल्यामुळे माझ्या व कुटुंबियांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला आहे. दुर्देवाने अशी काही दुर्घटना झाल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री वर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील. तरी कृपया माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात वाढ करावी ही नम्र विनंती.
Read also
- अमोल मिटकरींनी बावनकुळे, शेलार, राणे, अन् सोमय्यांना डिवचलं..! म्हणाले, “तुमचा दिवाळी फराळ”
- “निवडणुका झाल्यावर आकड्यांचा जो दावा केला जातो त्याला अर्थ नाही”
- संजय शिरसाठ यांना ह्दयविकाराचा झटका..! मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना तात्काळ फोन
- “भर मांडवात नवरदेव हाकलून द्यावा अशी भाजपची अंधेरीच्या निवडणुकीत गत”
- ” मग भाजपचं संस्कृत राजकाऱण कोल्हापुर अन् पंढरपुरच्या निवडणुकीत दिसलं असतं”