मुंबई : महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून भाजप जिंकत असताना अंधेरी पोटनिवडणुकीतून माघारी घेतली आहे. असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यावरून त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून खोचक टोले लगावले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपने माघारी घेतली कारण भाजपला पराभव दिसत होता. सर्वच संस्था या पोटनिवडणुकीत भाजप पराभूत होईल. असं सांगितले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर माघार घेणे हा भाजपकड़ून आलेला हा मुलामा आहे. भाजपला जर संवेदनशील राजकारण आणि संस्कृती कशी जपायची हे माहिती असतं तर कोल्हापुर किंवा पंढरपुरच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार दिला नसता,. अशी प्रतिक्रिया अंधारें यांनी दिली आहे.
“राज साहेबांनी अंधेरीची निवडणुक एकहाती जिंकली”
अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवारांनी देखील निवडणुक बिनविरोध व्हावी असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण उमेदवार माघार घेणार असल्याचं त्यांनी घोषीत केलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Read also
- “राऊत साहेब.. तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे”; मनसेचा खोचक टोला
- गटविकास अधिकारी झाला गावाचा सरपंच..! आघाडी करत उधळला गुलाल
- “कार्यकर्त्यांनो आपली ऊर्जा पालिकेच्या निवडणुकीसाठी ठेवा”; शेलाराचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “मी पुन्हा येईन, नंतर मी माघारी घेईन”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
- “भाजपला राज ठाकरेंनी पत्र लिहिणे, हे स्क्रिप्टचाच भाग”,पोटनिवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया