पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने आता ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ही निवडणुक आता बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी असं म्हटलं होतं. त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशा आशायाचं पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.
“राजकरणातील विद्यापीठ पवार साहेब आता मैदानात उतरलेत, लक्षात ठेवा”; रूपाली पाटलांनी सुनावलं
अंधेरी पोटनिवडणुकित भाजपने माघार घेतली आहे. त्यांना उशिरला आलेले शहाणपण आहे. देवा पाहतोय ना, तरीही शिवसेनच्या लटके वहिनीला जो त्रास दिला तो कायम स्मरणात राहील. परत अशा घटना नको, नीच वृत्ती राजकारण नको. जनता मायबाप आहे त्यांच्या पुढे काही चालणार नाही लक्षात ठेवावे. असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिला आहे.
“फडणवीस साहेब अंहकार बरा नव्हे, नियती तो कधी ना कधी उतरवतेच”; राष्ट्रवादीचा टोला
तर भाजपने आपला उमेदवार माघारी घेतल्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी कडाडून टिका केली आहे. मी पुन्हा येईन. नंतर मी माघारी घेईन. असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also
- “भाजपला राज ठाकरेंनी पत्र लिहिणे, हे स्क्रिप्टचाच भाग”,पोटनिवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया
- प्रतीक्षा संपली : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंद्राचे पाणी ! लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त प्रकल्प पाहणी
- “राज साहेबांनी अंधेरीची निवडणुक एकहाती जिंकली”
- “हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले”; काॅंग्रेसचा टोला
- “अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे, हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”