मुंबई : अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवारांनी देखील निवडणुक बिनविरोध व्हावी असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण उमेदवार माघार घेणार असल्याचं त्यांनी घोषीत केलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“फडणवीस साहेब अंहकार बरा नव्हे, नियती तो कधी ना कधी उतरवतेच”; राष्ट्रवादीचा टोला
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे स्क्रिप्टचाच भाग आहे. अंधेरी पुर्वची पोटनिवडणुक शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!
अंधेरी पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपने या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Read also
- प्रतीक्षा संपली : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंद्राचे पाणी ! लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त प्रकल्प पाहणी
- “राज साहेबांनी अंधेरीची निवडणुक एकहाती जिंकली”
- “हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले”; काॅंग्रेसचा टोला
- “अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे, हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”
- “राजकरणातील विद्यापीठ पवार साहेब आता मैदानात उतरलेत, लक्षात ठेवा”; रूपाली पाटलांनी सुनावलं