सुरगाणा : राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. सुरगाणा तालुक्यात प्रथमच निवृत्त गटविकास अधिकारी चिमन लक्ष्मण पवार यांची गुप ग्रामपंचायत उंबरपाडा दिगर ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी निवड झाली आहे. सरपंच पदासाठी गटविकास अधिक लोकांनी निवडून दिल्यामुळे सुरगाणा तालुक्यात उंबरपाडा दिगर ग्रामपंचायत चर्चेचा विषय ठरली आहे. तीन उमेदवार आणि उंबरपाडा दिगर आणि घागबारी गावामधून मतदान झाल्याने निवडणुकीमध्ये जोरदार रंगत बघायला मिळाली. यामध्ये उंबरपाडा दिगर या गावाने आघाडी करत चिमण पवार यांना लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं.
“हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले”; काॅंग्रेसचा टोला
गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाई गावाला भेडसावत आहे. लोकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी खुप दुरवर जावं लागतंय. लहान मुलांसाठी दर्जेदार शिक्षण मिळत नाही. गावात रस्ते, सुख सोयी सुविधापासून गावातील लोक वंचित राहिले आहेत, आणि याच गोष्टींचा विचार माझ्या मनामध्ये सातत्याने येत होता. त्यानंतर शासकीय सेवेतून निवृत्ती घेऊन आता लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी सरपंच पदासाठी निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला. यामध्ये लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आता पुढील पाच वर्षात माझा याच गावातील सर्वांगिन विकासावर लक्ष्य असणार आहे. अशी प्रतिक्रिया लोकनियुक्त सरपंच चिमन पवार यांनी दिली.
“अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे, हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”
दरम्यान, राज्यात 18 जिल्हांतील 82 तालुक्यांतील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी रविवारी 74 टक्के मतदान झालं. यामध्ये नाशिक जिल्हात जवळपास 187 ग्रामपंचायतीवर थेट सरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली.
Read also
- “कार्यकर्त्यांनो आपली ऊर्जा पालिकेच्या निवडणुकीसाठी ठेवा”; शेलाराचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “मी पुन्हा येईन, नंतर मी माघारी घेईन”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
- “भाजपला राज ठाकरेंनी पत्र लिहिणे, हे स्क्रिप्टचाच भाग”,पोटनिवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया
- प्रतीक्षा संपली : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंद्राचे पाणी ! लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त प्रकल्प पाहणी
- “राज साहेबांनी अंधेरीची निवडणुक एकहाती जिंकली”