मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंधेरी मतदार संघातील मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी दिली. तसेच ते कार्यकर्ते नाराज झाले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता मुंबईचे शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतेता राखण्याचे आवाहन केले आहे.
“अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे, हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”
मी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, पक्षानं निर्णय तर घेतलाच आहे. पण आपली ऊर्जा राखून ठेवा. दोन महिन्यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपण याचा सदुपयोग जरूर करूयात असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुरजी पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
“राजकरणातील विद्यापीठ पवार साहेब आता मैदानात उतरलेत, लक्षात ठेवा”; रूपाली पाटलांनी सुनावलं
मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी भाजपवर रोष व्यक्त केला. यावर बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत भावना व्यक्त कऱणं गरजेचं आहे. पण स्थानांतर होऊ नये. भाजपचे कार्यकर्ते या गोष्टीचे संपुर्ण भान राखतील याची मला अपेक्षा आहे. असंही ते म्हणाले. आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “मी पुन्हा येईन, नंतर मी माघारी घेईन”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
- “भाजपला राज ठाकरेंनी पत्र लिहिणे, हे स्क्रिप्टचाच भाग”,पोटनिवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया
- प्रतीक्षा संपली : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंद्राचे पाणी ! लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त प्रकल्प पाहणी
- “राज साहेबांनी अंधेरीची निवडणुक एकहाती जिंकली”
- “हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले”; काॅंग्रेसचा टोला