मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे स्क्रिप्टचाच भाग आहे. असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी त्यांना न्यायालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्याला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“राज साहेबांनी अंधेरीची निवडणुक एकहाती जिंकली”
संजय राऊत यांना सगळेच जण ओळखून आहेत. आपली तीच ओळख चांगली आहे. आजपर्यतं मी तुमच्या कोणत्याच टिकेला उत्तर दिले नाही. पण आजही तुम्ही राज ठाकरे यांच्याबद्दल गरळ ओकली. तुमच्या जडणघडणीत राज साहेबांची तुम्हाला खुप मोठी मदत झालेली असल्याचं विसरू नका, तुम्हाला जसे ओळखतात तेसच ओळखले जावे व एहसान फरामोश म्हणून तुमची ओळख होऊ नव्हे ही सदिच्छा असा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी संजय राऊतांना लगावला. तसेच यापुढे टिका करताना थोडा भान ठेऊन करा. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले”; काॅंग्रेसचा टोला
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे स्क्रिप्टचाच भाग आहे. अंधेरी पुर्वची पोटनिवडणुक शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Read also
- गटविकास अधिकारी झाला गावाचा सरपंच..! आघाडी करत उधळला गुलाल
- “कार्यकर्त्यांनो आपली ऊर्जा पालिकेच्या निवडणुकीसाठी ठेवा”; शेलाराचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “मी पुन्हा येईन, नंतर मी माघारी घेईन”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
- “भाजपला राज ठाकरेंनी पत्र लिहिणे, हे स्क्रिप्टचाच भाग”,पोटनिवडणुकीवर राऊतांची प्रतिक्रिया
- प्रतीक्षा संपली : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंद्राचे पाणी ! लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची संयुक्त प्रकल्प पाहणी