ठाणे : ठाण्यात रेल्वेने रुळांतर्गतच्या झोपड्पट्टीधारकांना नोटीस देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानं कल्याण, डोंबिवली भागातील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना घरं रिकामी करण्याचे आदेश देणारी नोटीस पाठवण्यात आली आहे. यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.
उत्पल पर्रिकरांना भाजपकडून तिकीट देत होतो, पण…; देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण
रेल्वेच्या रुळांतर्गत राहणाऱ्या रहिवास्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून खासदार श्रीकांत शिंदे हे आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी म्हटलं आहे हे. उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असणार आहे. यावेळी त्यांनी डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरासह शेलार नाका, कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरातील नागरिकांची भेट घेतली आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा झेंडा हसन मुश्रीफांच्या हाती; उपाध्यक्षपदी कोण?
जोपर्यंत रेल्वे प्रशासन कल्याण, डोंबिवली इतर भागातील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना राहण्यासाठी काही पक्क्या उपाययोजना करत नाही, तो पर्यंत याठिकाणी कारवाई होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका भूमिका श्रीकांत शिंदे यांनी घेतली आहे.रेल्वेला त्यांची जागा रिकामी करून हवी असेल तर त्यांनी अगोदर झोपडपट्टी धारकांसाठी एक पुनर्वसन धोरण तयार केलं पाहिजे. त्याशिवाय इथली घरं रिकामी होणार नाहीत. आम्ही लोकांचे प्रतिनिधी आणि खासदार या नात्याने त्यांच्या पाठीशी उभे असून उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर रेल्वे प्रशासनाला आपल्या जागांवर झालेलं अतिक्रमण आणि ते हटवण्याबाबत एकाकी खडबडून जाग आली. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर रेल्वेने ३० ते ४० वर्षांपासून राहणाऱ्या लोकांना नोटीसा बजावल्यात .
राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप
आधीच कोरोनाच्या महामारीमुळं लोकं भयभीत झाली असून या नोटीसमुळे आणखी भीती पसरली आहे. रेल्वेने नोटीस बजावत सांगितले आहे की सात दिवसांत घरं खाली करा. मात्र हे कोणत्याही परिस्थिमध्ये शक्य होणार आहे का ?”. २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्या कायद्याने संरक्षित असल्याची आठवण यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी करुन दिली आहे.
Read also:
- खासदार अमोल कोल्हेंचा नथुराम गोडसे वादाच्या भोवऱ्यात; आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
- खासदार अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेंना राष्ट्रवादीचाच विरोध; मंत्री आव्हाडांनी दिला इशारा
- नाशिक महापालिकेत ८०० कोटींचा घोटाळा; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फोडला मोठा बॉम्ब
- हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव; शिवसेना – भाजपात जुंपली
- हे ‘नथु’राम… खासदार अमोल कोल्हे यांचे “चिंतन”; सर्वकाही दिल्लीतील तख्तासाठी!