मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली असून सत्ता स्थापन केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपला या निवडणुकीत दारूण पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यातच कर्नाटकात राजकीय घटनांना वेग आला असून काॅंग्रेसच्या उमेदवारांना बंगळरूत हालवण्यात आलं आहे. यातच आता महाराष्ट्रात देखील असंंच चित्र निर्माण होऊ शकतं. असा आशावाद राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, आघाडीच्या काळातील ‘दोन’ प्रकरणात आज मोठी घडामोड
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारून पराभव होण्याच्या मार्गावर आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून आतापर्यंत १२५ जागांवर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप ७०, जेडीएस २२ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ केला आहे.
हेही वाचा…“तर शरद पवार पंतप्रधान झाले असते, आजही परिस्थिती बदलली तर ते होऊ शकतात, “
देशभरातील राज्यराज्यातून आणलेल्या पेट्या कर्नाटकमध्ये चालल्या नाहीत. लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. पैसा व विषारी जातीयवाद जनता लाथाडते, कर्नाटकच्या आजच्या निकालानंतरहे सिद्ध होत आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल. जय बजरंग बली असं म्हटलं आहे.
देशभरातील राज्यराज्यातून आणलेल्या पेट्या कर्नाटक मध्ये चालल्या नाहीत. लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. पैसा व विषारी जातीयवाद जनता लाथाडते,कर्नाटकच्या आजच्या निकालानंतर हे सिद्ध होतेय. मविआने महाराष्ट्रात मेहनत घेतली तर 2024 मधे महाराष्ट्रातील भाजपाची घाण साफ होईल#जयबजरंगबली
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…निपाणीत कुणाचं पार्सल परत जाणार, शरद पवार की फडणवीस, ? राष्ट्रवादी अन् भाजपात काटे की टक्कर
हेही वाचा…“मोदींच्या तब्बल १९ जाहीर सभा, ७ रोड शो,” तरीही कर्नाटकात भाजपला दणका, काॅंग्रेस सरकार स्थापन करणार ?
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ..!मोदी-शाहांना जनतेने झिडकारलं, काॅंग्रेस बहुमताच्या दिशेने
हेही वाचा…पुण्यात भरदिवसा हत्या..! राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल, परिसरात हळहळ व्यक्त
हेही वाचा…काॅंग्रेसचे दोन्ही नेते आपांसात भिडले, पटोले- वडेट्टीवार मधील ‘ते’ प्रकरण कारणीभूत