नाशिक : देशात शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. शिवसेनेचे वाघ तिकडे पोहोचले म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जाऊन प्राण प्रतिष्ठा करता आली. असं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज नाशिकात ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होत आहेत. त्यामध्ये ते बोलत होते.
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
लोक म्हणतात. रामाशी आमचं नातं नाही. जिथे हे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे. कुरूक्षेत्र आहे, कारण इथून आपण लढाई सूरू केली होती. आम्ही काय कुणाचे खातो, जे आम्हाला देतो, हे धर्मक्षेत्र आहे. लढाई आपण कुरूक्षेत्रातून सुरू करणार आहोत. असेही संजय राऊत म्हणाले. यातच जो राम पंचवटीतील आहे. तोच राम अयोध्येतला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी नाशिकची निवड केली. असेही राऊतांनी नमुद केलं.
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
दरम्यान, पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, रामाचे धैर्य शिवसेनेचे आहे. रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरे यांचा संयम आहे. धैर्य आमच्याकडे नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी पाडली नसती. भाजपकडे धैर्य नाही. बाबरी कोसळली तसं त्यांचं धैर्य कोसळलं आणि आम्ही केलं ही नाही असं सांगितले. दिलीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, अशी चेतावणी देखील राऊतांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…*उद्धव ठाकरेंची आज नाशकात तोफ धडाडणार, कुणावर हल्लाबोल, कुणावर प्रहार ?*
हेही वाचा…“मुंबईत मराठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण महाराष्ट्रात….” जरांगे पाटलांनी सरकारला दिला पुन्हा इशारा
हेही वाचा…“आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या यांची डोकी फिरली की तुमची..,” शरद पवार गटाने सुनील तटकरेंना दिला इशारा
हेही वाचा….कॉंग्रेसच्या माजी खासदारांचं पक्षातून निलंबन, भाजपमध्ये प्रवेश, पुढील लोकसभेत रक्षा खडसेंचा पत्ता कट ?
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल