मुंबई : एखादा वरिष्ठ नेता असेल तर त्यांना चांगलं खातं मिळावं, असा प्रत्येकाचा आग्रह असू शकतो. परंतु ते मिळलेच असं काही नाही. त्यामुळे आग्रह करणं वेगळं आणि मिळणं वेगळं आहे. त्यामुळे राज्यातील सगळी भौगोलिक परिस्थिती पाहुन तिन्ही पक्षातील आमदारांना समतोल ठेऊन खातेवाटप करतील. अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना शिंदे गटातील खाती देण्यात येणार का? यावर विचारले असता त्यांनी आपलं उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर बावनकुळेंनी उत्तर द्यावे,” अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार
मंत्रिमंडळ विस्तारात दोन्ही पक्षातील थोडी थोडी खाती तिसऱ्या घटक पक्षाला द्यावी लागतील. त्यासंर्दभात आता तिन्ही नेत्यांची बैठक होत असून त्याबाबत चर्चा होत आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्हीही पक्ष काम करत आहेत. त्यामुळे योग्य खातेवाटप होईल. असही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“फोन आला की लगेच मुंबईला निघू,” मंत्रिमंडळ विस्तारावर भरत गोगावलेंचं मोठं विधान
दरम्यान, अजित दादा अर्थमंत्री असतांना मंत्रालयात सात वाजता येऊन काम केले आहे. त्यामुळे तुम्ही जर राष्ट्रवादीला १०० कोटी देत असतील तर आमच्या पक्षाला २०० कोटी रूपये द्या. अशी तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला जास्त निधी दिला जायचा. त्याच्यावर जास्त कंट्रोल कुणाचा असायला हवा. त्याच्या दुप्पट निधी मुख्यमंत्र्यांने आम्हाला दिला पाहिजे. असंही उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच काही विकासकामांना स्थगिती द्यायची की नाही ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी तर उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा”,भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…कामाला लागा..! सर्वात जास्त जागा निवडून येतील, काॅंग्रेसला महाराष्ट्राकडून अपेक्षा, वरिष्ठ नेत्यांचे आदेश
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सध्या मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…शरद पवार गटाने बाहेर काढलं, अजित पवार गटाने जवळ घेतलं, राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या नियुक्त्या
हेही वाचा…“तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील,” भाजपच्या बड्या नेत्याच विधान