नवी दिल्ली : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काॅंग्रेसमध्ये देखील फुट पाडली जाईल, अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात केली जात आहे. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड करून शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं. यातच आता विधिमंडळात सर्वात जास्त संख्या काॅंग्रेसची असल्याने विरोधी पक्षनेते पद देखील त्यांच्याकडे जाणार. या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज राज्यातील काॅंग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
हेही वाचा…“चक्की पिसिंग पिसिगंवर आरोप केले, त्याचं काय झालं?” अजित पवारांवरून ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
दिल्लीत होत असलेल्या काॅंग्रेसच्या बैठकीसाठी राज्यातील २५ नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह अनेक बडे नेत्यांना दिल्लीच्या बैठकीत बोलवण्यात आले आहे. या बैठकीत काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे राहुल गांधी उपस्थित राहणार असून राज्यातील विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…मोदींना पवारांच्या हस्ते पुरस्कार, मग ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय ? ठाकरेंचा सवाल
दरम्यान, दिल्लीत झालेल्या काॅंग्रेसच्या बैठकीत काॅंग्रेस नेत्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर आता राज्यातील झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा काॅंग्रेसला होऊ शकतो. यातच महाराष्ट्र हा काॅंग्रेस विचारधारेचा प्रदेश आहे. महाराष्ट्रकडून काॅंग्रेसला जास्त जागांवर विजयाची अपेक्षा असल्याचं म्हटलं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सध्या मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज”, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…शरद पवार गटाने बाहेर काढलं, अजित पवार गटाने जवळ घेतलं, राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या नियुक्त्या
हेही वाचा…“तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील,” भाजपच्या बड्या नेत्याच विधान
हेही वाचा…“कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर बावनकुळेंनी उत्तर द्यावे,” अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार
हेही वाचा…“फोन आला की लगेच मुंबईला निघू,” मंत्रिमंडळ विस्तारावर भरत गोगावलेंचं मोठं विधान