दिल्ली : एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर सगळ्यांचे लक्ष असताना दुसरीकडे निलंबित भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत गुप्त भेट घेतली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्ली दौरा केल्याने, राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यांनतर आता दिल्लीत राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील आमदार, तसेच खासदार यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
सोमवारी राज्यातील सर्व भाजप खासदारांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, चंद्रकांत पाटील यांनी सं. ७ वा. ही बैठक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बोलावली आहे. दुसरीकडे विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, जयप्रकाश रावल, संजय कुटे, श्रीकांत भारतीय, नाशिक-जळगावचेही महत्त्वाचे पदाधिकारी आणि फडणवीस आज दिल्ली दरबारी आले असल्याने, दिल्लीत शिजतंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रदेशाध्यक्ष बदलीवरून चंद्रकांत पाटील म्हणतात, “भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार पण…”
या बैठकीला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्तावित बदल, पक्षसंघटनेत व्यापक बदल करण्याबाबत, मनसेबरोबरची घोषित-अघोषित युती, महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती, या खात्रीलायक मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
भाजपत अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने गाठले टोक, शहर भाजपची टीम दिल्ली दरबारी दाखल
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलामध्ये आमदार आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर आहे, तर पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आणि विनोद तावडेंकडे हरयाणाची जबाबदारी आहे. त्यानिमित्ताने हे दोघे नेते पक्षाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. मात्र असे असले तरी, भाजपत नेमकी कोणती स्थानिक राजकीय खलबते सुरू आहेत? राज्य सरकारविरोधात व्यूहरचना दिल्लीत आखली जातेय का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जाऊ लागले आहेत.
२०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
आज सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या असून, “या चर्चा फक्त माध्यमांत आहेत. दर ३ वर्षांनी पक्षात फेरबदल होतो. तो अगदी तळागाळातल्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत तो होत असतो. राज्याला पहिल्यांदाच केंद्रात जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी दिल्लीत आलो”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
Read Also :
- लवकरच येईन! महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंचा महाविकास आघाडीला इशारा
- राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, आठवड्याभरापासून आहेत उपचार सुरु
- “पुण्याचा विकास फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार”, चाकणकरांचा टोला
- कॉलेजनंतर आता हॉटेलवर ईडीची छापेमारी, समन्स बजावूनही गैरहजर राहत असल्याने कारवाई केली जात असल्याची चर्चा
- “ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका