दिल्ली : पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी, एकदाही पत्रकार परिषद घेऊन, देशातल्या मुद्द्यांवर पत्रकारांशी चर्चा करून, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नसल्याने, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर सातत्याने टीका केली गेली आहे.
“दगडातूनही तेल काढू शकतात, भलताच ब्रिलियंट माणूस”, राज्यपालांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधला असून, एकीकडे राहुल गांधी पत्रकार परिषद घेत असताना आणि दुसरीकडे मोदी पत्रकार परिषद घेत असतानाचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. विशेष म्हणजे मोदींकडच्या बाजूचा फोटो हा काळा ठेवण्यात आला आहे.
(Pic-1) Shri. @RahulGandhi in a Press Conference
(Pic-2) Shri Narendra Modi in a Press Conference
Here's why #BJPFearsRahulGandhi pic.twitter.com/seglmchyBy
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 7, 2021
९ मिनिटांच्या क्लिपमध्ये अखेर दडलंय तरी काय? भाजप मनसे युतीच्या प्रवासातील दुसरा एपिसोड
महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो ट्विट करण्यात आला असून, पहिल्या फोटोत राहुल गांधी आहेत आणि त्यांच्या फोटोला, “राहुल गांधी पत्रकार परिषद घेताना” असं कॅप्शन दिलं गेलं आहे, तर दुसऱ्या फोटोत मोदी आहेत आणि त्यांच्या फोटोला “मोदी पत्रकार परिषद घेताना” असं कॅप्शन दिलं गेलं आहे, म्हणजेच पंतप्रधान मोदींनी कधीही पत्रकार परिषद घेतली नाही, असं काँग्रेसकडून सांगण्याचा प्रयत्न आहे.
BJP fears the voice of India.
BJP fears the reality.#BJPFearsRahulGandhi pic.twitter.com/ZtKn2ljAg3— Congress (@INCIndia) August 7, 2021
महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार
राहुल गांधी सातत्याने आक्रमकपणे भाजपविरोधी भूमिका मांडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महागाई, इंधनदरवाढ, पेगॅसस हेरगिरी, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण अश्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काँग्रेसने, मोदी सरकार आणि भाजपला धारेवर धरले आहे. मात्र, असं असलं तरी मोदी माध्यामांसमोर येत नाहीत. कारण ते पत्रकार परिषद घ्यायला घाबरतात, राहुल गांधींना घाबरतात”, असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे.
Read Also :
- शिवसेनेच्या मुखपत्रातून फोडला गेला राजकीय बॉम्ब, अजून एका ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाचे संकेत?
- २०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
- भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
- “चावी आपल्या हातात आहे अंदाज घेऊन फिरवू कशी फिरावायची” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
- … तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना ३०% जागा देणार, काँग्रेसची मोठी घोषणा