रायगड : पेण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत धैर्यशील पाटील यांनी भाजपच्या गमशा गळ्यात घातला आहे. यामुळे कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला ढिल्ला केल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा..“तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का?” महाराजांच्या अरबी समु्द्रतील पुतळ्यावरून अजित पवारांनी सरकार घेरलं
सुधागड पालीच्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालेकर यांनी नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वंसत ओसवाल यांच्या गीता पालेकर कन्या आहेत. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील शेकापचे चर्चेतील नेते दिलीप भोईर हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून दोन वेळा कारभार पाहिला आहे. याच सोबत पेण विधानसभा मतदार संघातील जवळपास ५०० हुन अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेणचे आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन
यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपले प्रश्न धडाडीने धैर्यशील पाटील मांडत असतं. “धैर्यशील पाटील यांनी कायमच समाजाभिमुख राजकारण केलं आहे. तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आहे. देशाचं नेतृत्त्व मोदी करत आहेत. त्यांचं नेतृत्वही असाच विचार करणारं आहे. त्यामुळे हे सांगू इच्छितो की धैर्यशील पाटील यांनी पक्ष बदलला असला तरीही त्यांचा विचार बदललेला नाही. त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो.”
Read also
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”
- हेही वाचा..“.“तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजाचं, पुण्याला फुलेंच तर नागपुरला आंबेडकरांच नाव द्या,” खासदाराची मागणी
- हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले
- हेही वाचा..“बाळाला उराशी धरून काल हंबरडा फोडला”, आज एकनाथ शिंदेंनी थेट निर्णय घेतला
- हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं