मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी स्वरूपात सध्या सुरू आहे. यातच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुवाहाटीला जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भास्कर जाधव यांनी १०० फोन केले होते. तसेच त्यांनी गुवाहाटीचं तिकीटंही काढलं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यांना घेतलं नसल्याचं वक्तव्य मोहित कंबोज यांनी केलं. त्यावर आता भास्कर जाधव यांनी मोहित कंबोजला प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड
मोहित कंबोज ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलं नाही. त्यांनी केलेलं एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावं. असं म्हणत भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी आवाहन दिलं आहे. त्यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहे, सत्ता आहे, पोलीस खातं आहे. हे सर्व चौकशीला लावा. जर या चौकशीतून एक जरी आरोप सिद्ध झालं तरी मी राजकारण सोडून देईन, असा थेट इशारा भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
हेही वाचा..कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार
त्याचबरोबर भास्कर जाधव यांनी मोहित कंबोजवर खालच्या पातळीवर टिका करत आव्हान दिलं. तसेच देवेंद्र फडणवीसांचा त्यांनी अनाजी पंत असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला. तुम्ही महाराष्ट्र्च्या राजकारणाची संस्कृती मिटवत आहात. परंतु त्यासाठी असे १०० भास्कर जाधव उभे राहणार. त्यांचा घरदारं जाळून त्यांना संपवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आम्ही मागे हटणार नाहीत. असं म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर जहरी टिका केली.
Read also
- हेही वाचा.“राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकाला कवडीमोल भाव नाही, शेतकरी हवालदिल,” अजित पवार
- हेही वाचा.सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी
- हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं
- हेही वाचा..“ईडी-सीबीआय भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्रे,” मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात आपचं जोरदार आंदोलन
- हेही वाचा..निकालाआधी पुण्यात लागले बॅनर, निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल