मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या काळात भूमिपुजन झालेली काम पाहण्यासाठी खास हेलिकाॅप्टर दिल्लीहून मुंबईला पाठवलं होतं. ते हेलिकाॅप्टर अरबी समुद्रात दहा वेळेस गिरट्या घातल्या. परंतु त्यांना महाराजांचं स्मारक काही दिसलं नाही. असं म्हणत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपुजनावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच तुम्ही महाराजांचे फोटो लावून मत घेतलीत. स्मारकाचं भुमिपुजन तुम्ही घाईघाईने केलं. तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का? असा सवालही अजित पवारांनी सरकारला केला.
हेही वाचा..निकालाआधी पुण्यात लागले बॅनर, निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल
पहिल्या पाच वर्षात अन् आता सहा महिन्यात का झालं नाही स्मारक यांचं उत्तर द्या. भूमिपुजन तुम्ही केलं होतं. तो निर्णयही तुम्ही घेतला. त्यासाठी पंतप्रधानांनाही तुम्ही बोलवलं होतं. त्यानंतर भुमिपुजन केल्यानंतर तिथे डोकावूनही बघायचं नाही. हे कुठलं तुमचं राजकारण? असा सवाल करीत त्यांनी इंदु मिलचा मुद्दाही विधानभवनात मांडला.
हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचाही राज्य सरकारला विसर पडला आहे. भाजपला ज्यांनी बहुजनांनाचा चेहरा दिला, त्या गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तीचं स्मारक देखील होऊ, असं त्यांना वाटतही नाही, त्यांचा उल्लेख केला जात नाही. असं म्हणत अजित पवारांनी मागील काही घटनांचाही उल्लेख केला. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर महापुरूषांच्याबाबत बेताल वक्तव्य करण्याचंही प्रमाण वाढलं असल्याचं अजित पवारांनी सांगत राज्य सरकारवर राग व्यक्त केला.
Read also
- हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन
- हेही वाचा.“राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकाला कवडीमोल भाव नाही, शेतकरी हवालदिल,” अजित पवार
- हेही वाचा.सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी
- हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं
- हेही वाचा..“ईडी-सीबीआय भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्रे,” मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात आपचं जोरदार आंदोलन