मुंबई : सत्तासंघर्षावर आजपासून सलग तीन दिवस सुनावणी सुरू झाली आहे. आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर सत्तासंघर्षावरील युक्तिवाद लवकरात लवकर संपवा,असं म्हणत या प्रकरणातील निकाल याच आठवड्यात लागणार असे संकेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी कोर्टात दिले. त्यातच दुसरीकडे शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन
आज सकाळीच शिवसेना पक्षाच्या बैठकीत विधान परिषदेचे आमदार विप्लव गोपीकिशन बाजोरी या यांची शिवसेना पक्षाच्या विधानपरिषद प्रतोद निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी विधान परिषद उपसभापती यांना कळवली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी काही काळात ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांना याचा धोक्का निर्माण झाला आहे.
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकाला कवडीमोल भाव नाही, शेतकरी हवालदिल,” अजित पवार
त्यानंतर संसदेतील कार्यालयावरही शिवसेने कब्जा घेतला. त्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटोही हटवण्यात आले. त्यानंतर शिवसेना संसदीय पक्षाच्या गटनेते पदावरून संजय राऊत यांना हटवण्यास सुरूवात झाली आहे. त्यांच्याजागी खासदार गजानन कीर्तिकर यांची शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड व्हावी यासाठी पत्र शिवसेना लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी पाठवलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी
निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप बजावला आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा विधान परिषदेकडे वळवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
Read also
- हेही वाचा..“.“तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजाचं, पुण्याला फुलेंच तर नागपुरला आंबेडकरांच नाव द्या,” खासदाराची मागणी
- हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले
- हेही वाचा..“बाळाला उराशी धरून काल हंबरडा फोडला”, आज एकनाथ शिंदेंनी थेट निर्णय घेतला
- हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं
- हेही वाचा..“तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का?” महाराजांच्या अरबी समु्द्रतील पुतळ्यावरून अजित पवारांनी सरकार घेरलं