मुंबई : निवडणुक चिन्ह आणि नाव गेल्यानंतर अनेक जण मला येऊन भेटले. साहेब निवडणुका येऊ द्या, ही आपल्याला एक मोठी संधी आहे. हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान असून ते आपल्यालाल जिंकायचेच आहे. शिवसेना म्हणजे केवळ नाव आणि चिन्ह नाही, ती हजारोंच्या मनात भिनलेली आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही. असा इशाराही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा..“ईडी-सीबीआय भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्रे,” मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात आपचं जोरदार आंदोलन
“लोकशाहीची चिंता करण्यासाठी लोक समर्थ आहेत. तुम्ही विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला तरी २०२४ च्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला ऐतिहासिक विजय मिळेल. एक मात्र नक्की हिंदुत्वाचा विचार सोडल्यामुळे २०२४ नंतर तुमचं. किंचित सेनेचं स्थान काय असेल हे बघा.” असा खोचक इशाराही चंद्रशेखर बावनुकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.अलिकडेच उद्धव ठाकरे यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली होती. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं.
हेही वाचा..निकालाआधी पुण्यात लागले बॅनर, निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल
मराठी भाषा गौरव दिनी बिर्ला मातोश्री सभागृह येथे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि निवडणुक आयोगावर प्रखरशब्दात टिका केली. निवडणुक आयोग बोगस आहे. त्याला चुना आयोग म्हणायला हवे. सगळं भाजपच्या सोयीने सुरू आहे. आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणुक कदाचित शेवटची निवडणुक असेल. कपिल सिब्बल जे म्हणाले ते योग्य आहे. घटना स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मध्येच निवडणुक आयोगाने चोमडेपणा करण्याची गरज नव्हती. अशी नाराजी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही कडाडून टिका केली. चोरीला मामला, जोरजोरात बोंबली, अशी शिंदे गटाची अवस्था; सर्वकाही चोराल, पण ठाकरे कसे चोराल, ठाकरे मी एकटा नाही, माझ्यासमोर असलेली जनता म्हणजे ठाकरे, काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत. आई वडिल जे संस्कार देतात ते झाले नाहीत. की मग दुसऱ्यांची गोष्ट चोरण्याची वेळ येते. त्यामुळे मी चोरांवर जास्त बोलणार नाही. त्यांना लाज लज्जा नसेल. पण दिवारमध्ये जसा हातावर शिक्का होता, तसाच जे जेव्हा छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावर शिक्का असेल की, स्वत: चोर आहेस. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. असा टोलाही त्यांनी हाणला.
उद्धवजी लोकशाहीची चिंता करण्यासाठी लोक समर्थ आहेत. तुम्ही विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला तरी २०२४ च्या निवडणुकीत मोदीजींच्या नेतृत्वात भाजपला ऐतिहासिक विजय मिळेल. एक मात्र नक्की हिंदुत्वाचा विचार सोडल्यामुळे २०२४ नंतर तुमचं,तुमच्या किंचित सेनेचं स्थान काय असेल हे बघा.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) February 28, 2023
Read also
- हेही वाचा..“तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का?” महाराजांच्या अरबी समु्द्रतील पुतळ्यावरून अजित पवारांनी सरकार घेरलं
- हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन
- हेही वाचा.“राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकाला कवडीमोल भाव नाही, शेतकरी हवालदिल,” अजित पवार
- हेही वाचा.सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी
- हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं