मुंबई : राज्यातील अनेक शहारात भटके जनावरे रस्त्याच्या मधोभागी, किंवा सार्वजनिक ठिकाणी बसतात. त्याच्यावर कुणीच दखल घेत नाही. तसेच अलिकडेच दोन वळूमध्ये तुफान मारामारीत अनेक लोक जखमी झालेत. गाड्याचं नुकसान झालं. लोकांना दुखापत झाली. आता त्या वळूंनी तुम्ही आवरणार कसे ? असा सवाल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टोलेबाजी करत खोचक सवाल केलेत. गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” असं म्हटल्यानंतर त्यावरून सभागृहात एकच हश्श्या पिकला.
हेही वाचा.सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी
सध्या अनेक छोट्या मोठ्या शहरात या जनावराचं प्रमाण वाढलं आहे. नाशिकमध्ये सीईओने भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे आदेश काढलेत. त्यानंतर त्यांच्यावर केस झाली. त्यांचा अनेकांना त्रास होतो. परंतु त्यावर कायदा असल्याने त्या कुत्र्यांवर काहीच करता येत नाही. असं म्हणत हा प्रकार आता थांबवला पाहिजे. अशी मागणीही छगन भुजबळ यांनी केली.
हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं
भटके जनावरे सस्त्यावर बसल्याने पुणे, नाशिक, मुंबई सारख्या मोठ्या शहरात वाहतुक कोंडी निर्माण होते. काहीही कारण नसतांना आपण कैद्याची सजा काढून टाकण्यात आली. आता फक्त त्यांच्याकडून दंड घेतला जातो. याकडे कुणीच दखल घेत नसल्याने याची अमंलबजावणीही केली जात नाही. परंतु याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच त्या रस्यावर झालेल्या लढाईत वळू कुणाचं ऐकतच नव्हते. त्यावेळी मला आठवलं की, जर गिरीश महाजन असते, तर त्या वळूला पकडलचं असतं. परंतु तुम्ही नव्हता मग काय करणार. असं म्हणत जोरदार टोलेबाजीही त्यांनी केली.
Read also
- “बाळाला उराशी धरून काल हंबरडा फोडला”, आज एकनाथ शिंदेंनी थेट निर्णय घेतला
- हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं
- हेही वाचा..“तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का?” महाराजांच्या अरबी समु्द्रतील पुतळ्यावरून अजित पवारांनी सरकार घेरलं
- हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन
- हेही वाचा.“राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकाला कवडीमोल भाव नाही, शेतकरी हवालदिल,” अजित पवार