नाशिक : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर आता राज्यात निवडणुकांचा धमाका उडणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पुढे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका देखील होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी राष्ट्रवादीने आता प्रत्येक तालुक्यात 50 स्टार प्रचारक म्हणून नेमणार आहेत.
“फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती तसेच महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विधायक कामांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आता प्रत्येक तालुक्यामध्ये 50 स्टार प्रचारक अर्थातच सुपर 50 स्टार ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टिकोनामधून सक्रिय कार्यकर्त्यांना प्रचारक म्हणून नियुक्ती देण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे.
“भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
सोशल मीडियाच्या माध्यमातून पारंपारिक आंदोलन व छोटा मोठा व्हिडीओ टाकण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विकास कामांचा तसेच ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणाकरिता माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले योगदान हे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत केस पोहोचेल यावरती नाशिक येथे झालेल्या बैठकीत सांगण्यात आलं. त्यामुळे मोठी ताकद पक्षाला मिळणार असल्याची देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
“मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर आता आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सोबत लढणार की स्वतंत्र लढणार ते आता आगामी काळातच पाहवं लागणार आहे.
Read also
- “महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये बनवलीय, ती तुटू शकते”
- लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
- “अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
- “..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
- “८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड