नवी दिल्ली : देशातील सहा राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये इंडिया आघाडीने सातपैकी चार जांगावर विजय मिळवला असून ३ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे ४ विरूद्ध ३ अशी असा निकाल सध्या संपुर्ण देशात दिसत आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड, उत्तराखंड, त्रिपुरा राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या.
हेही वाचा…अन् ठाकरेंच्या हातात ठेवली लहान मुलानं लोणचं आणि भाकरीची शिदोरी, म्हणाले, हीच आमची..,
उत्तर प्रदेशातल्या घोसीमध्ये समाजवादीचे विद्यमान आमदार दारा सिंह चौहान पक्ष बदल करून भाजपमध्ये गेले होते. INDIA आघाडीने तिथे एकत्रित उमेदवार दिला होता. त्याठिकाणा त्यांचा पराभव झाला असून सुधाकर यांनी भाजपच्या दारा सिंह यांचा ४२६७२ मतांनी पराभव केला आहे. उत्तर प्रदेश आणि झारखंड दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीने एकत्रित उमेदवार दिला होता.
हेही वाचा…फडणवीसांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, भाजपची मुंबईत तातडीची बैठक
पश्चिम बंगाल मध्ये भाजपची विधानसभा सीट तृणमूल काँग्रेसने हिसकावून घेतली आहे. धुपगुडी मतदारसंघात तृणमूल काॅंग्रेसने ४००० मतांनी विजय मिळवला आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल समोर एक जागा गमावली पण त्रिपुरामध्ये डाव्याकडून एक जागा हिसकावली. बॉक्सानगर आणि धनपूर मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे.
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार
धनपूरमधून भाजपच्या बिंदू देबनाथ यांनी सीपीआय एम च्या कौशिक चंदा यांचा १८, ८७१ मतांनी पराभव केला आहे. तर बॉक्सानगर येथे तफज्जल हुसैन यांनी सीपीआय एम च्या मिजान हुसैन यांचा ३०, २३७ मतांनी पराभव केला आहे. उत्तराखंड राज्यात बागेश्वर मतदार संघातून भाजपच्या पार्वती दास यांनी विजय मिळवला आहे. तर झारखंडमध्ये डुमरी मतदारसंघात इंडिया आघाडीकडून झारखंड मुक्ति मोर्चा च्या बेबी देवी यांनी बाजी मारली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सल्ला देण्याची सवय काकडेंच्या अंगलट, नितेश राणेंनी चांगलेच झापले
हेही वाचा…“कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल…,” प्रकाश आंबडेकरांचे मोदींना पाच सवाल
हेही वाचा…सरकारचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी स्विकारला, जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय