पुणे: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर नियोजन समिती स्थापन झाली होती. या समितीची मुदत २०१९ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या- पुणे महानगर नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती सोमवारी अखेर राज्य शासनाकडून करण्यात आली.
हे पण वाचा: नामनियुक्त सदस्यांची नेमणूक करणे, राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य -उच्च न्यायालय
पुणे महानगर नियोजन समितीच्या आगामी पाच वर्षांसाठी समिती गठण करण्यात आले असून, या समितीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत. कोरोना महामारीमुळे लागू असलेले निर्बंध लक्षात घेता थेट निवडणुकीद्वारे निवड निवडून देण्याच्या तीस सदस्यांच्या निवडणूक विलंब लागत असल्याने शासनाने नामनिर्देशित आणि खासदार आमदार यांच्यामधून वरून नियुक्त करण्याच्या सदस्याची नियुक्ती केली आहे. ही समिती स्थापन झाल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा लवकरच प्रसिद्ध होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, ही समिती स्थापन करून राज्य सरकारने महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाआणखी एक दणका दिला आहे.
हे पण वाचा: पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
त्यामुळे ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखडा तयार होऊन देखील समिती अस्तित्वात नसल्यामुळे त्याच्या मान्यतेअभावी प्रारूप प्रसिद्ध करता येत नव्हता. ही समिती स्थापन करून, त्या माध्यमातून विकास आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर महापालिकेच्या हद्दीत गावे समाविष्ट केली जातील, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात २३ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय ३० जून रोजी महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्या पाठोपाठ १४ जुलै रोजी या गावासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले होते.
हे पण वाचा: या मंत्र्यांना डच्चू, तर या मंत्र्यांना मिळू शकते संधी; लवकरच राज्य मंत्रिमंडळातही फेरबदलाचे संकेत
त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने त्यावर आक्षेप घेत या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर केला होता. तसेच राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. परंतु त्या आधी सरकारने नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती करून, आराखडा मान्यतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे बोलले जात आहे.
Read Also :
- ‘सामाना’तल्या फटकेबाजीवरून संजय राऊत-नाना पटोलेंमध्ये तुंबळ वाक्युद्ध
- मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
- पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा