मुंबई : मोदी सरकारच्या मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर, आता ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. यात अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिली जाणार असल्याची शक्यता आहे, तर नवीन नवीन, उत्साही आणि कार्यक्षम मंत्र्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या मंत्री मंडळातून आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.
१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा, तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या दोघांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीकडील प्रत्येकी एक मंत्रिपद रिक्त आहे. मात्र, या मंत्री मंडळातून आता काँग्रेसच्याही दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, काँग्रेसच्याही दोन जागा रिक्त होणार आहेत.
संसदीय समितीच्या बैठकीत मोदींनी उठवले, काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह, म्हणाले…
त्यामुळे, तिन्ही पक्षांकडून या रिक्त जागांच्या पदासाठी योग्य आणि लायक उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, काँग्रेकडून त्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांच्या सातत्याने दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. काँग्रेसमध्ये सध्या गृहराज्यमंत्रिपदाची जबाबदरी असलेले सतेज पाटील, प्रणिती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर असणारी जबाबादरी देखील मंत्रीपद देऊन वाढवली जाण्याची शक्यता आहे.
तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अजून कोणती नावे यादीत आहेत, याची अजून माहिती समोर आली असून, लवकरच याबाबात माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदासह १२ मंत्रिपदं त्यात ८ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं, काँग्रेसकडे १० पैकी ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्रिपदं आणि राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपदासह १४ मंत्रिपदं त्यात १० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं आहेत.
Read Also :
- ‘सामाना’तल्या फटकेबाजीवरून संजय राऊत-नाना पटोलेंमध्ये तुंबळ वाक्युद्ध
- मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
- पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा