नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांचं कौतुक विरोधी पक्षांनी देखील केलं आहे. त्यांनी रस्ते विकासाबाबत अनेक योजना यशस्वीपणे देशात राबवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक सगळ्या स्तरातून केलं जात आहे. अशातच आज लोकसभेत त्यांनी भारतातील रस्तेविकासाबाबात महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत
नितीन गडकरी म्हणाले की, भारतामधील रस्त्यांचं जाळं आणि संबंधित पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचं नियोजन केंद्र सरकारने ठरवले आहे. त्यामुळे आगामी काही काळात रस्ते सुरक्षासंदर्भात लोकांमध्ये अधिक जनजागृतीची आवश्यकता असून त्यांसंदर्भात महत्वाची पावलं उचचली जातील. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका
ते पुढे म्हणाले की, भारतात रस्त्यांचं जाळं उभारणं हीच एकमेव समस्या नाही. रस्ते उभारणी तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल इंजिनिअऱिंग, लोकांमध्ये जनजागृती आणि शिक्षण हे देखील महत्वाचे मुद्दे ठरतात. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर वाढणारी अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण ही केंद्र सरकारसाठी मोठी चिंतेची बाब असल्याचंही ते म्हणाले.
“जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका
भारतात सध्या रस्त्यांवरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अलिकडेच विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. प्रवीण दरेकर यांच्या वाहनांच्या ताफ्याचा महिन्यातून तब्बल 3 वेळा अपघात झाला होता. त्यामुळे रस्त्यांवरील अपघातांच्या समस्यांवर अजूनही ठोस उपाययोजना करण्य़ात आली नाही.
Read also:
- “कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
- महाराष्ट्रातचं काय? काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत करा ना टॅक्समुक्त; काश्मिर फाईल्स चित्रपटावरून अजित पवारांनी सुनावलं
- स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह यांच्या मुळ गावी झाला भगवंत मान यांचा शपथविधी; पंजाबनंतर आपचं पुढचं नियोजन ठरलं
- नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
- दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार