मुंबई : गोवा आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही. त्यावरून भाजपने त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करत डिवचण्याचा प्रयत्न केला. अशातच आता आज शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत बैठक पार पडली. त्यात 22 मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका
दिल्लीत पार पडलेल्या बैठकीबाबत संजय राऊत म्हणाले की, आज शिवसेना खासदारांची नवी दिल्लीत बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार आम्ही दिल्लीत एकत्र जमलो होतो. या बैठकीत संघटनात्मक बाबींबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात 22 मार्चपासून शिवसेनेेचे शिवसंपर्क अभियान सुरू करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचं पुन्हा ‘खळखट्याक’; आयपीएलसाठी परराज्यातून आणलेल्या सर्व बसेस फोडल्या
राज्यातील विदर्भ मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानाद्वारे शिवसेनेचे खासदार यावेळी जनतेशी संवाद साधणार आहे. तसेच महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी खासदार लोकांशी संवाद साधणार आहेत. कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी यासाठी शिवसेनेचे खासदार दौरा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार
गेल्या विधानसभेत शिवसेनेची कामगिरी निराक्षाजनक झाली. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांचं डिपॉजिट देखील जप्त करण्यात आलं. तसचं राज्यातील महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करीत असतांना शिवसेनेचे अभियान कितपत प्रभावी ठरणार , ते पहाणं आता महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- महाराष्ट्रातचं काय? काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत करा ना टॅक्समुक्त; काश्मिर फाईल्स चित्रपटावरून अजित पवारांनी सुनावलं
- स्वातंत्र्यसैनिक भगतसिंह यांच्या मुळ गावी झाला भगवंत मान यांचा शपथविधी; पंजाबनंतर आपचं पुढचं नियोजन ठरलं
- नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
- दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
- काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत