पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत मांडला. काल राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी अभिभाषण केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काल आर्थिक पाहणी अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. त्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे.
“हिमंत असेल तर ये इथे”; अनिल परब किरीट सोमय्यांवर भडकले
गतवर्षी केंद्राने सेसचं प्रमाण वाढवल्याने २०२१-२२ मध्ये केंद्राच्या १ रु खर्चात राज्यांना केंद्रीय करापोटी मिळत असलेले २० पैसे २०२२-२३ मध्ये १६ पैसे पर्यंत घसरले. वाढीव सेस, बंद झालेली GST भरपाई, केंद्र पुरस्कृत योजनांचा वाढलेला खर्च यामुळे राज्यांची आर्थिक मुस्कटदाबी होत आहे. केंद्राच्या या धोरणाचा एकट्या महाराष्ट्राला ५० हजार कोटींचा भुर्दंड बसत आहे.किमान यंदाच्या अर्थसंकल्पात तरी संघराज्य पद्धतीला न्याय देत उपाययोजना केल्या जातील हा विश्वास आहे. राज्यांना मिळणारा केंद्रीय करातील वाटा २० पैशाच्या वर जाईल ही अपेक्षा करूयात. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
गेल्या वर्षी ६५००० कोटीच्या सरकारी कंपन्या विकण्याची घोषणा केली. आता किमान पुढील वर्षी येणाऱ्या निवडणुकांची भीती बाळगून यंदा तरी सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही अपेक्षा. त्याचबरोबर आरोग्यावरील खर्च २.५ ते ३ % पर्यंत करण्याची शिफारस असतानाही गतवर्षी आरोग्यावरील खर्चात कपात करत २.१ % केला. यंदा तरी हा खर्च वाढवण्यावर सरकारने भर द्यावा. सरकारी खर्च वाढल्यास जनसामान्यांवरचा ताण कमी होऊन क्रयशक्ती वाढेल, परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”
दरम्यान, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन दुप्पट करण्याचं आश्वासन तडीस नेण्यासाठी आतातरी प्रामाणिकपणे पाऊले उचलायला हवीत. केवळ घोषणा नकोत तर शाश्वत योजना हव्यात. खतांच्या अनुदानात कपात होणार नाही ही बळीराजाची अपेक्षा असून सरकार बळीराजाचा अपेक्षाभंग करणार नाही ही अपेक्षा असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद
- “रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला
- “भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल
- सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर