मुंबई : बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमधील बांधकाम अनधिकृत असून ते पाडल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला. त्यावर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचं सोमय्यांनी आरोप केलेत. त्यानंतर अनिल परब यांच्यासह असंख्य शिवसेैनिक बांद्रे येथील म्हाडाच्या वसाहतीत ठाण मांडून बसले. परंतु आव्हान दिल्यानंतरही सोमय्या पाडलेलं बांधकाम बघण्यासाठी आले नाहीत. यावरून अनिल परब यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
“लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हाच भाजपची पोटनिवडणुकीची तयारी”
पोलिसांनी आव्हान केलं होतं, की सोमय्यांना याठिकाणी घेऊन या. त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत. हिमंत असती तर आला असता परंतु किरीट सोमय्या हा घाबरट असून पळपुटा आहे. तसेच तो म्हाडा, महापालिका मुकादम नाही. त्याला ही नौटंकी करायची सवय आहे. त्याला आम्ही काही मारतो म्हणून सांगितलं नाही तर उलट त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या शिवसैनिक महिला होत्या. त्याला ओवळलं असतं. तसेच आम्ही त्याचे हातपाय तोडण्याची भाषा करीत नाहीत. अस अनिल परब यांनी म्हटलं.
“राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समित्या जाहीर “
तसेच या प्रकरणाचा लढा असून संपलेला नाही. या ऑर्डरच्या आधारावर बिल्डर्सना घाबरवणार. ब्लकमेकींग करणार आणि लोकांना कमी जागा देण्यासाठी या ऑर्डरचा वापर केला जाईल. याचं पाप किरीट सोमय्या आणि भाजपला लागणार आहे. तसेच किरीट सोमय्या हा भाजपने पाळलेला वळू आहे. असा आक्रमकपणे सांगत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचाही समाचार घेतला.
“पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे भाजपला आता कसे सुचले”, शरद पवारांचा भाजपला सवाल
दरम्यान, सोमय्यांच्या आरोपांनंतर अनिल परब यांनी थेट म्हाडाच्या कार्यालयात याची चौकशी केली. म्हाडाचा संबंध हा अनिल परब यांच्याशी आहे. असा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यावर या प्रकरणात अनिल परब यांचा कोणताही संबंध नसल्याचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. असं अनिल परब यांनी केला आहे.
Read also
- सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका
- “लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर
- “हिमंत असेल तर ये इथे”; अनिल परब किरीट सोमय्यांवर भडकले
- सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर…! चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
- “ठाण्यात शिंदेंकडून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता, 15 ते 20 नगरसेवक बंडाळीच्या दिशेने”