मुंबई : दोन वर्षापुर्वी कोरोनाचं सावट असल्याने राज्यात एकही मोठा सण,जयंती, किंवा कार्यक्रम झाला नाही. यांसदर्भात राज्य सरकारने कडक नियम जारी केले होते. यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती या दोन वर्षात साजरी करता आली नाही. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या आंबेडकर जयंती बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमचा एकच दणकट बसला तरी आईचं दुध आठवेल; सावंताचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करू यात. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरात लवकर प्रसिद्ध केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य मुश्रिपांकडून 1, 2 कोटी मंजूर करून आणतो, ते सेनेच्या आमदार, खासदारांनाही मिळत नाही
गेली दोन वर्षे डॉ बाबासाहेबांची जयंती उत्सव व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता हे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलीस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन व तयारी केली आहे. राज्यभरात देखील उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेतून अनंत गितेंना बाहेरचा रस्ता; शरद पवारांवर केलेली टीका भोवली
दरम्यान, कोरोना काळात नियम तोडत तरूण, विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी त्यांना पोलिसांना उठ बशा तर अनेकांना लाटीचा प्रसाद दिला होता. यात अनेक विद्य़ार्थ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना भविष्यात नोकरीच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि इतर अडचणी लक्षात घेता गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Read also:
- मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
- आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
- हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
- पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
- खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर