मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची अलिकडेच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. त्यातच वंचितला महाविकास आघाडी सामावून घेणार का ? हा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
शिंदे गटाने नवस केलेल्या कामाख्या देवीचा चित्ररथ कर्तव्यपथावर, अनेकांच्या नजरा
शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी होता. त्यानंतर तीन चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत. समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
“संविधानाच्या तत्त्वांना सत्ताधारी पक्षांकडून हादरे देण्याचा प्रयत्न,” राष्ट्रवादीचा निशाणा
त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाष्य केलं आहे. तसाच एक प्रकारे इशाराच दिला आहे. त्यावर महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात. पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
“कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस
शरद पवार भाजपचे असते तर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून त्यांनी भाजपला रोखले नसते. 50 खोके, एकदम ओके करून आणि सूरत तसेच गुवाहाटीच्या कामाख्या देवीला आमदारांना नेऊन महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रकार करण्यात आला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर बोलतात म्हणून पवार साहेब भाजपचे होते नाहीत. आंबेडकरांच्या शब्दावर देश चालत नाही. पवार साहेबांनी उंची काय आहे, हे सर्वांना माहित आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी पवारांनी सत्तेचा विचार केला नाही. सत्तेसाठी काम करणारे पवार साहेब नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी शुद्धीवर येऊन बोलले तर बरे होईल. अस राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Read also
- “शरद पवार आजही भाजपसोबत, पहाटेचा शपथविधीही नंतर..;”प्रकाश आबंडेकरांचं मोठं वक्तव्य
- “खून देने की जरूरत नहीं, तुम्ही हमें सिर्फ वोट दे दो..!” उद्धव ठाकरेंचं शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून आवाहन
- “माझ्या बाजूला जलील बसले मग आम्ही एमआयएमचे झालो का?” संजय शिरसाठ
- “उद्धव ठाकरेंना विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
- ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसतांना आव्हाड मुंब्याच्या कोणत्या बिळात लपून बसला?