मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटांच्या बाजूने एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी देखील होत असते. यातच औरंगाबाद येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते एकमेकांच्या बाजूला बसले. त्यावर दोन्ही बाजूंनी चांगलीच टोलेबाजीही बघायला मिळाली आहेे.
शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री, संजय शिरसाठ तसेच खासदार इम्तियाज जलील हे एकाच रांगेत बसलेले दिसले. त्यावरून शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची टोलेबाजी बघायला मिळाली.
“मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगरांना अधिकाऱ्यांना मारण्याचा परवाना दिलाय का?” राष्ट्रवादीचा संतप्त सवाल
यावेळी अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांच्या पासून थोडा अंतर ठेऊन बसले होते. तर त्याच्याच जागी संजय शिरसाठ बसलेले दिसले. त्यावर खैरे म्हणाले की, यावरून दानवेंना माझ्या जवळ बसायला सांगितले होते. पण तेच तिकडे बसले. तसेच ते विरोधी पक्षनेते आहेत. म्हणून तिकडे बसले. असं म्हणत त्यांनी संजय शिरसाठ यांच्यावर बोलण्याचं टाळलं.
‘‘इंद्रायणी थडी’’मुळे मिळेल २० हजार महिलांच्या हाताला रोजगार! फडणवीसांकडून महोत्सवाचे कौतूक
त्यानंतर व्हिआयपी खुर्ची आहे. त्यामुळे जवळ बसण्याचं काहीच कारण नाही. आता माझ्याजवळ इम्तियाज जलीलही बसले आहेत. मग मी एमआयएममध्ये गेलो असं होत नाही. चंद्रकांत खैरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी आणि आम्ही एकत्र शिवसेना वाढविली. तसेच ते माझे दुश्मन नाहीत. अस त्यानंतर संजय शिरसाठ यांनी म्हटले.
Read also
- “उद्धव ठाकरेंना विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
- ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसतांना आव्हाड मुंब्याच्या कोणत्या बिळात लपून बसला?
- शिंदे गटाने नवस केलेल्या कामाख्या देवीचा चित्ररथ कर्तव्यपथावर, अनेकांच्या नजरा
- “संविधानाच्या तत्त्वांना सत्ताधारी पक्षांकडून हादरे देण्याचा प्रयत्न,” राष्ट्रवादीचा निशाणा
- “कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस