ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील जैन मंदिराला भेट दिली. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून त्यांनी जैन मंदिरात छोटेखानी भाषणही केलं. आज या निमित्ताने तुम्हाला खून देण्याची गरज नाही तर मतं देण्याची आम्हाला गरज आहे. जाणाऱ्याला जाऊ द्या, निष्ठावंत माझ्याकडे आहे. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
“कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस
आचार्य महाराजांनी अखंड भारताचं स्वप्न पाहिलं आहे. त्यामुळे ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी आशीर्वादाची गरज आहे. जर आशीर्वाद मिळालं तर कोणत्याही गोष्ट अवघड नाही. याठिकाणी फक्त मी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थितीत होते.
शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात
तसेच जे गेले आहेत त्यांना जाऊ द्या. माझ्याकडे निष्ठावंत शिल्लक राहिले आहेत. ते सगळे विकले गेले आहेत. हे आता सगळ्यांना माहिती झाले आहे . त्यांचा समाचार लवकरच ठाण्याच्या सभेतून घेणार आहे. असंही म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच आगामी काही दिवसात ते ठाण्यात सभा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
Read also
- “माझ्या बाजूला जलील बसले मग आम्ही एमआयएमचे झालो का?” संजय शिरसाठ
- “उद्धव ठाकरेंना विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
- ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसतांना आव्हाड मुंब्याच्या कोणत्या बिळात लपून बसला?
- शिंदे गटाने नवस केलेल्या कामाख्या देवीचा चित्ररथ कर्तव्यपथावर, अनेकांच्या नजरा
- “संविधानाच्या तत्त्वांना सत्ताधारी पक्षांकडून हादरे देण्याचा प्रयत्न,” राष्ट्रवादीचा निशाणा