मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची अलिकडेच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. त्यातच वंचितला महाविकास आघाडी सामावून घेणार का ? हा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
“संविधानाच्या तत्त्वांना सत्ताधारी पक्षांकडून हादरे देण्याचा प्रयत्न,” राष्ट्रवादीचा निशाणा
शरद पवार हे आजही भाजपसोबत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी होता. त्यानंतर तीन चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत. समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
“कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, हे सगळ्यांना उचित राहिल…!” देवेंद्र फडणवीस
त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाष्य केलं आहे. तसाच एक प्रकारे इशाराच दिला आहे. त्यावर महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात. पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही.
शिंदेंनी बारामतीचा गड फोडला…! बारामती, दौंड, अन् इंदापुरचे कार्यकर्ते शिंदे गटात
दरम्यान, राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देखील प्रकाश आंबेकर यांच्यावर टिका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांना बोलवता धनी वेगळाच आहे. ते शांत स्वभावाचे आहेत. असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Read also
- “खून देने की जरूरत नहीं, तुम्ही हमें सिर्फ वोट दे दो..!” उद्धव ठाकरेंचं शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून आवाहन
- “माझ्या बाजूला जलील बसले मग आम्ही एमआयएमचे झालो का?” संजय शिरसाठ
- “उद्धव ठाकरेंना विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या निर्णयाला विरोध”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
- ‘पठाण’मुळे मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसतांना आव्हाड मुंब्याच्या कोणत्या बिळात लपून बसला?
- शिंदे गटाने नवस केलेल्या कामाख्या देवीचा चित्ररथ कर्तव्यपथावर, अनेकांच्या नजरा