मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडक देण्याच्या तयारीत आहे. आज मनोज जरांगे पाटलांची वाशीत सभा होत असून या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांना जीआर देण्यात आला आहे. या जीआरचं वाचन जरांगे पाटील मराठ्यांसमोर करणार आहेत. यावर तोडगा निघाला नाही तर जरांगे पाटलांसह असंख्य मराठे बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. यावरून आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
छगन भुजबळ म्हणाले की, कायद्याचा कसोटीवर जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांमध्ये काय बसतं आहे ते सरकार पाहत आहे. मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. जर उद्या ओबीसींवर अन्याय झाला हे लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसींचही आंदोलन सुरू होईल. मला वाटतं की सरकार दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य निर्णय घेतील. जी आमची मतं आहेत ती आम्ही सभांमधून मांडत असतो. मात्र ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही आंदोलन करू असं भुजबळांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मुंबईत काही झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार”, विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा
दरम्यान, जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा सुरू केला. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात भुजबळ विरूद्ध जरांगे पाटील असा वाद उदयास आला. ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली. तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली. यानंतर एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप झालेत.
READ ALSO :
हेही वाचा…“तर गावाकडे राहिलेले सर्वच मराठे झाडून मुंबईत येतील”, जरांगे पाटलांनी दिला सरकारला इशारा
हेही वाचा…“प्रचंड गर्दी, डोक्यावर आग ओकणारा सुर्य”, जरांगे पाटलांकडे सरकारचा जीआर घेऊन आलेल्या मंगेश चिवटे खाली कोसळले
हेही वाचा…जरांगे पाटलांनी आपला मुक्काम वाशीत वाढवला, जरांगे पाटलांच्या सरकारकडून कोणत्या मागण्या मान्य झाल्या ?
हेही वाचा‘मराठा वादळ’ जरांगे पाटलांनी वाशीतच रोखला, पण सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया