सोलापूर : तलाठी भरती परिक्षच्या दरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने पहिल्याद दिवशी विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तर पहिल्याद दिवशी पेपर फुटण्याचे प्रकरण समोर आल्याने राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला. यावरून राज्य सरकारवर जोरदार टिका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा…कांदा सगळ्यांनाच रडवणार, केंद्र सरकारचा फसवा डाव
भरती परिक्षेदरम्यान अनेक जिल्ह्यांत परिक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच परिक्षेच्या पहिल्याद दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. नाशिक येथील एका परिक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली असून परिक्षा केंद्र मॅनेज करण्यात येत असल्याचे प्रकार घड असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी असं जयंत पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…नाशिकमध्ये ‘या’ गावात शेतकऱ्यांनी कांदे फेकले रस्त्यावर, निवडणुकांवर टाकला बहिष्कार
तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान डाऊन झालेले सर्व्हर, पहिल्याच दिवशी झालेले पेपर फुटण्याचे प्रकरण, म्हाडा भरती परीक्षा प्रक्रियेत झालेले गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे घडत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांना या सर्व प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करत दोषींवर कारवाई करावी. तसेच अशा घटना पुन्हा घडू नये आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या धर्तीवर स्वतंत्र आयोग किंवा MPSC मध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करावा अशी मागणी जयंत पाटलांनी केलीय.
तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान डाऊन झालेले सर्व्हर, पहिल्याच दिवशी झालेले पेपर फुटण्याचे प्रकरण, म्हाडा भरती परीक्षा प्रक्रियेत झालेले गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे घडत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष… pic.twitter.com/2Ee35P3ynv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंची ताकद वाढली, ‘या’ माजी आमदार अन् माजी खासदाराचा ठाकरे गटात प्रवेश”
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् ठाकरे गटाला एकाच वेळी धक्का, एकनाथ शिंदेंची मोठी खेळी
हेही वाचा…“शिंदेसोबत गुवाहाटीला गेल्याने आम्ही बदनाम झालो”, बच्चू कडूंनी व्यक्त केली भावना
हेही वाचा…“सिलेंडर ५०० रूपये., महिलांना महिन्याला १५०० रूपये, १०० युनीट वीज युनीट माफ,” काॅंग्रेसने ‘या’ राज्यात केल्या मोठ्या घोषणा
हेही वाचा…अजित पवारांमुळे शिंदेंच्याआमदारांची गोची अन् रामदास आठवले सांगताहेत, “आम्हालाही मंत्रिपद हवंय”