मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यसभेसाठी येत्या 10 तारखेला मतदान होत असून एकुण 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उभे राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाला एक एक मत निवडणुक जिंकण्यासाठी महत्वाचं आहे. यातच आता महाविकास आघाडीतील मोठा धक्का बसला आहे. यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ज्यांना घोडेबाजार होईल, असं वाटतं त्यांच्या खिशात चणे, फुटाणे असतील”
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा झाली असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या तसेच अजून कोणताही गुन्हा स्पष्ट न झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळावा, अशी आमची मागणी होती. मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. हा न्यायालयाचा निकाल असल्यामुळे यासंदर्भात पुढील पावले टाकण्याबाबत नवाब मलिक व अनिल देशमुख यांचे वकील भूमिका ठरवतील, असे जयंत पाटील म्हणाले.
“शिवसेनेमुळेच ‘उमा खापरे’ यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी”; दिपाली सय्यद
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करणे हे लोकप्रतिधींचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी हे मतदान केले नाही. तर ते आपल्या कर्तव्यापासून वंचित राहितील. त्यामुळे जनतेच्या मताचाही अनादर होईल, असा युक्तिवाद देशमुख-मलिक यांच्या वकिलांना न्यायालयात मांडला. परंतु लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गेत कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचा दावा इडीने न्यायालयात केला, आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, “गेल्या 40 वर्षात..;”
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी जामीन अर्ज सादर केला होता. मात्र गुरूवारी यावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना मतदानासाठी जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांना दोन मतांवर पाणी फेरावं लागणार आहे.
Read also:
- व्हिलचेअरवरून भाजपचे दोन आमदार विधानभवनात येणार ; राजकीय घडामोडींना वेग
- “न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गालावर बारावी थप्पट मारली”; जामीन अर्ज फेटाळ्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
- “उद्या भाजपला पळता भुई थोडी होणार, तिन पटांची थोबाड बंद होण्यासाठी काही तास शिल्लक”
- इडीने केला आघाडीचा घात; निवडणुकीसाठी नवाब-देशमुखांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली पाहिजे होती, याचा परिणाम होईल; छगन भुजबळ यांचं सुचक वक्तव्य