मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली असून सत्ता स्थापन केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपला या निवडणुकीत दारूण पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यातच कर्नाटकात राजकीय घटनांना वेग आला असून काॅंग्रेसच्या उमेदवारांना बंगळरूत हालवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा…पुण्यात भरदिवसा हत्या..! राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल, परिसरात हळहळ व्यक्त
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारून पराभव होण्याच्या मार्गावर आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून आतापर्यंत १२५ जागांवर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप ७०, जेडीएस २२ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ केला आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसचे दोन्ही नेते आपांसात भिडले, पटोले- वडेट्टीवार मधील ‘ते’ प्रकरण कारणीभूत
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या प्रचारात मोदींच्या धार्मिक धुर्व्रीकरणाचा कोणताही परिणाम पडलेला नाही. भाजप हे ४० टक्के कमिशन घेणारं सरकार असल्याचं लोकांनी पक्क ठरवलं. या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. हे नक्की आहे. दक्षिण मधील भाजपचा दरवाजा बंद झालेला आहे. पुढे तीन राज्यात निवडणुका होणार असून त्याचा यावर परिणाम होणार आहे. तर महाराष्ट्र हा सर्वात पुढे असणारा राज्य आहे. असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, आघाडीच्या काळातील ‘दोन’ प्रकरणात आज मोठी घडामोड
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याठिकाणी जातात. तिथे त्यांच्या नेतृत्वाचा परिणाम होतो. परंतु कर्नाटकात तेथील स्थानिक कार्यकर्यांनी बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना स्विकारलचं नाही. त्यानंतर त्याआधी येडीरूप्पा यांना तुरूंगात टाकून त्यांचा अपमान झाला. असे अनेक परिणाम त्यांच्यावर झालेत. असंही ते म्हणाले. मोदी यांनी सर्व यंत्रणा वापरल्या, शक्ती वापरली, मात्र त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला. तिथल्या बहुसंख्य भागातील उमेदवार पडले. देशाचा मुड खोटा प्रचार आणि धार्मिक धुर्वीकरमाच्या विरोधात आहे. द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही. हा मोदीजींचा पराभव आहे. जनतेचा विजय आहे. असं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
मोदीजींनी सर्व यंत्रणा वापरल्या, शक्ती वापरली, मात्र त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला तिथल्या बहुसंख्य भागातील भाजपचे उमेदवार पडले. देशाचा मूड खोटा प्रचार आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधात आहे. द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही. हा मोदीजींचा पराभव आहे. जनतेचा विजय आहे.…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’ – फडणवीसांची उपस्थिती, महेश लांडगेंची वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल
हेही वाचा…“महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मेहनत घेतली, तर २०२४ मध्ये महाराष्ट्रातील भाजपची घाण साफ होईल”
हेही वाचा…निपाणीत कुणाचं पार्सल परत जाणार, शरद पवार की फडणवीस, ? राष्ट्रवादी अन् भाजपात काटे की टक्कर
हेही वाचा…“मोदींच्या तब्बल १९ जाहीर सभा, ७ रोड शो,” तरीही कर्नाटकात भाजपला दणका, काॅंग्रेस सरकार स्थापन करणार ?
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ..!मोदी-शाहांना जनतेने झिडकारलं, काॅंग्रेस बहुमताच्या दिशेने