पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता काॅंग्रेसने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या राजकीय डावपेचांमुळे काॅंग्रेसला कर्नाटकात विजय मिळविता आला, तेच डावपेच आता महाराष्ट्रात अंमलात आणण्याचा विचार काॅंग्रेसतर्फे सुरू आहे. त्यामुळे कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रात देखील हा प्रकार यशस्वी होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी
अखिल भारतीय काॅंग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मलल्किार्जून खर्गे जातीने लक्ष घालत असून ज्येष्ठ राजकीय रणनीतीकार सुनील कानुगोलू यांची मदत घेतली जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस समितीच्या आगामी राज्यस्तरीय बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकांमध्ये काॅंग्रेस या राजकीय खेळीचा वापर करणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीने आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांच्या वाटपाबाबत आखणी सुरू आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तिन्ही पक्षांतील प्रत्येकी २ सदस्य अशी ६ सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद रूचेना..? मुळीक म्हणाले “आजही आमच्या मनात सल…”
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…डीआरडीओ कुरूलकर प्रकरणात नवी माहिती, वायुदलाचा अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये
हेही वाचा…“..तर त्यांना अजीबात सोडणार नाही, सगळं बाहेर काढू, “देवेंद्र फडणवीसांनी थेट इशाराच दिला