पुणे : येत्या 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकांसदर्भात राष्ट्रवादीची बैठक झाली आहे. या बैठकीत कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची यादी आमच्याकडे आली आहे. 2004, 2009 किंवा 2014 साली ही निवडणुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीने लढविल्या होत्या. त्यात निर्णयक मतंही घेतली होती. त्यामुळे ही पोटनिवडणुक देखील राष्ट्रवादीने लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. असं पुण्याचे राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.
“राष्ट्रवादीचा आमदार बंड करण्याच्या तयारीत, शिंदेंच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ”
मागच्या निवडणुकांचा इतिहास लक्षात घेतला तर सध्यातरी राष्ट्रवादीची यंत्रणां सगळीकडे भक्कम आहे. त्यामुळे आम्ही या निवडणुकांसाठी इच्छुकांची नावे घेतली आहे. यामध्ये अंकुश काकडे, रविंद्र माळोदकर, वनराज्य अधिकारी, रूपाली पाटील, अण्णासाहेब थोरात अशी प्रमुख नावं पुढे आलेली आहेत. ही नावं शरद पवार, अजित पवार, जंयत पाटलांकडे देणार आहोत. निर्णय हा तेच घेणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढवायाची आहे की, इतर पक्षांना द्यायाची हा त्यांचा अधिकार असल्याचं जगताप यांनी सांगितले.
“सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला
भाजपला आव्हान देतांना इतर पक्ष कमी पडत असतांना आपला उमेदवार द्यावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच येणाऱ्या आगामी महापालिकाच्या निवडणुकवर ही जागा निश्चितच राष्ट्रवादीकडे येणार याची खात्री आहे. तसेच 1999 पासून आम्ही काॅंग्रेससोबत आघाडीत होतो. कसबा पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच होती. परंतु सुशील कुमार शिंदे यांनी रोहित टिळक यांच्यासाठी ही जागा मागवून घेतली. त्यावेळी शरद पवारांनी त्यांचा मान ठेवला. त्यामुळे ही जागा काॅंग्रेसची कधीच नव्हती. ती राष्ट्रवादीचीच होती. असंही प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे.
“थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, 2014 आणि 2019 विधानसभेच्या निवडणुकांचा काळ पाहिला तर कसबा पेठ विधानसभेत राष्ट्रवादीचा आकडा मोठा आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांची यंत्रणा इतर पक्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीने राष्ट्रवादीलाच सोडावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “सुनील शेळकेंना भेटून, योग्य तो निर्णय घेऊ”, अजित पवारांचं शेळकेंबाबत मोठं वक्तव्य
- “आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांची ‘निर्मल’ आशा धुळीस मिळाली”; जितेंद्र आव्हाड
- “महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच, उलट घोषणा, आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव”
- मोदींच्या शेवटच्या बजेटमधील कररचनेत मोठे बदल, 7 लाखांपर्यंत कर सवलत
- “बजेट सुरू असताना मोदी मोदीचा जय जय, दुसरीकडे विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा”