पुणे : पोटनिवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक झाली, यात काही काॅंग्रेसची लोकं आली नाहीत. परंतु उद्धव ठाकरे आणि आमच्यात याबाबत चर्चा झाली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात माझ्याकडे आठ ते नऊ लोकांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली आहे. त्याच संदर्भात कसबा पेठच्या पोटनिवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून, हा प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवणार आहे. असं राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे.
“सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला
मागील काळात फक्त राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची आघाडी होती, त्यावेळस कसब्यातील जागा ही काॅंग्रेसला सोडली होती. त्यामुळेच कदाचित काॅंग्रेसने तयारी सुरू केली असावी. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करतांना मला शिवसेना, काॅंग्रेस आणि आमच्या पक्षातील नेत्यांशी बोलावं लागेल. असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.
“थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद
तुळजापुर, नांदेड, पंढरपुर आणि देगलुर याठिकाणी देखील निवडणुक झाली आहे. त्यामुळे भाजपने बिनविरोध निवडणुक व्हावी, यासाठी जे पत्र पाठवलं आहे. ते कितपत योग्य आहे? असा सवालही अजित पवार यांनी केला. तसेच सुनील अण्णा शेळके कोणत्या हेतूने बोलले आहेत. ते मला काही सांगता येणार नाहीत. त्यानंतर त्यांच्याशी भेटून काय आहे ते क्लिअर करणार असं अजित पवार यांनी म्हटलं.
“रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला
पिंपरी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादीत बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी एकाच गाडीत प्रवास केल्याने चर्चांना उधान आलं आहे. काही दिवसांपासून अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात बिनसलं होतं. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुढचं तिकीट दुसऱ्या उमेदवारा दिले जाणार आहे. अशी चर्चा आहे. अण्णा बनसोडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अत्यंविधीवेळी देखील ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शिंदे गटात गेले तर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अण्णा बनसोडे शिंदे गटात जातील, अशी चर्चा रंगली आहे.
Read also
- “आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांची ‘निर्मल’ आशा धुळीस मिळाली”; जितेंद्र आव्हाड
- “महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच, उलट घोषणा, आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव”
- मोदींच्या शेवटच्या बजेटमधील कररचनेत मोठे बदल, 7 लाखांपर्यंत कर सवलत
- “बजेट सुरू असताना मोदी मोदीचा जय जय, दुसरीकडे विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा”
- “राष्ट्रवादीचा आमदार बंड करण्याच्या तयारीत, शिंदेंच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ”