मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना जे भाजपचे नेते नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. ते काहीसे आता शांत झाल्याचं दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
“भास्कर जाधव यांची अवकात काय? हा नाच्या आमदार”; रामदास कदमांचा हल्लाबोल
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर तुटून पडले होते. यामध्ये अनिल परब, भावना गवळी, यामिनी जाधव, यशवंत जाधव तसेच प्रताप सरदेसाई यांचा समावेश आहे. यांच्यावर किरीट सोमय्या सातत्याने हल्ला चढवत होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्याने आणि या नेत्यांनी शिंदेंना पाठिंबा दिल्याने किरीट सोमय्या आता शांत झाल्याचे दिसत आहेत.
“सोमय्यांना तोंड लपवत फिरण्याची वेळ फडणवीसांनी त्यांच्यावर आणली”; रूपाली पाटलांचा खोचक टोला
केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत या नेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील किरीट सोमय्या सातत्याने करीत आले आहेत. परंतु शिंदेंना पाठिंबा दिलेल्या नेत्यांबाबत किरीट सोमय्या सध्या काही बोलताना दिसत नाही. यावरून अमोल मिटकरी यांनी सोमय्यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात सोमय्यांनी केलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर ते पत्रकारांना उत्तरे देताना दिसत आहेत. तसेच ते त्या व्हिडीओमध्ये थोडसे गोंधळेलेले देखील दिसून आले. यावरून दु:ख सांगावे कुणाला? किरीट काका भाजप व शिंदे सरकारने असे तुमच्यासोबत तरी वागायला नको होते. तुमच्या दु:खात आम्ही सर्वच सहभागी आहोत. असं म्हणत मिटकरींना त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“ताई अजून तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत”; मनसेचा ‘त्या’ ट्विटवरून टोला
दरम्यान, तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये असलेले मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील भाजप नेत्या चित्रा वाघ या सातत्याने हल्ला चढवत होत्या. भावना गवळींना देखील किरीट सोमय्या तुरूंगात डांबण्याची भाषा करीत होते. तसेच या सर्व नेत्यांवर इडी चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी देखील सोमय्या करीत होते. परंतु आता ते चित्र बदललं आहे. त्यामुळे सोमय्यांवर विरोधक टिका करीत आहे.
Read also
- मतदारसंघात एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही : चंद्रकांत पाटील
- “माॅंसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्याऱ्या कदमांना सुट्टी देऊ नका भावांनो”; सुषमा अंधारे भडकल्या
- “मला काही समजतं नाही, राज्यात काय नेमकं काय चाललंय”; राज ठाकरेंचं भाष्य
- “शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना असं समीकरण”; दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- “आपल्याला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येकाला पक्षात समाविष्ट करून घ्या”; जयंत पाटील