मुंबई : आम्ही अनेक त्सुनाम्या दर 15 वर्षांनी पाहिल्या आहेत. यात जी शिवसेनेची पडझड झाली आहे. ती भरून काढण्याची ताकद आम्ही शिवसैनिकत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच भगवा पडकणार असून त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करणार आहे. असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर आमदार दिपक केसरकर यांना देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; चित्रा वाघ म्हणाल्या…;
आदित्य ठाकरे हे सध्या संजय राऊतांची भाषा बोलू लागले आहेत. यावर बोलताना त्या म्हणाल्या की दिपक केसरकर हे उडते पंछी आहेत. इकडनं उड तिकडे बस, तिकडनं उड इकडे बस. त्यामुळे आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल काहीही विचारू नका, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी केसरकरांना लगावला.
“एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती
आजच्या घडीला सगळेच जण आशावादी आहेत. काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. पण आजही आम्ही बंधुत्वाच्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे आशा बाळगण्यात काहीच गैर नाही. दिपाली सय्यद यांच्या मध्यस्थीने काही चांगलं घडणार असेल तर चांगलंच आहे. पण आलात तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय असंही त्या म्हणाल्या.
“सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार
शिवसेनेत गळाचेपी होत असल्याने आपण हा निर्णय घेतला आहे असं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर मी सुद्धा एका शिवसैनिकाप्रमाणे वागले. आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. बंड का आणि कसा झाला? असा प्रश्न मलाही पडला होता. त्यामुळे मी ही शिंदे गाटावर टीका केली. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भुमिका ऐकली तेव्हा हेच आमचंही दुखणं आहे असं वाटलं. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जावं हे प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं. पण वरिष्ठांनी आमची भुमिका पक्षप्रमुखांपर्यंत पोहचवलीच नाही. ही माझ्यासोबत प्रत्येक शिवसेनेच्या नगरसेवकाची वेदना आहे असंही त्या म्हणाल्या.
Read also
- प्रभाग रचनेवरून काॅंग्रेसने शिवसेनेला घेरलं; थेट पत्रचं पाठवलं
- शिंदे गटाला धडा शिकवणारच, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या सेनेच्या नेत्याचा 2 दिवसात शिंदेंना पाठिंबा
- “शिवसेना फोडण्यात राष्ट्रवादीचा मोठा हात”; दिपक केसरकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
- “बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं”
- किती दिवस फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, खासदार ह्याची चर्चा करत बसणार?